रस्त्यावरील खड्डे व दहीहंडी उत्सवाबाबतचे वृत्त (२९ जुल) वाचले. पावसाळा सुरू होताच रस्त्यांवर खड्डय़ांचे आगमन होते आणि श्रावण सुरूहोताच रस्त्यावरील उत्सवांना पेव फुटतो. दहीहंडीपासून सुरूहोणारा हा सिलसिला नवरात्र, चत्री नवरात्र अशा विविध सण व उत्सवांनिमित्त सुरूच राहतो. उत्सव साजरे करताना रस्ते अडविल्यामुळे होणारी नागरिकांची आत्यंतिक गैरसोय, खोळंबा, प्रवासाचा वाढणारा वेळ, त्यासाठी लागणारे जादा इंधन, मोठय़ा प्रमाणावर होणारे प्रदूषण, उत्सव संपल्यानंतर होणारी रस्त्यांची हानी, ते दुरुस्त करण्यासाठी महापालिकेवर पडणारा अतिरिक्त खर्चाचा बोजा आदी सर्व बाबींचा विचार करून ठाण्यातील शांतताप्रेमी, सजग नागरिकांनी या गर पायंडय़ाला विरोध केला आहे. गेली काही वष्रे त्यासाठी लढा दिला आहे. तथापि हे विरोध डावलून अशा उत्सवांच्या संख्येत दरवर्षी भर पडत आहे.
या उत्सवांचा मुख्य हेतू राजकीय लाभ उठविणे हाच आढळतो. तसेच अशा उत्सवांना अनुमती दिली जाते ती मुख्यत्वे राजकीय दडपणाखालीच. याबाबत कायद्याचा कीस काढून हे उत्सव रीतसर परवानगी घेऊन केले असल्याने कायदेशीर आहेत असे समर्थन जरी केले तरी राजकीय पक्षांनी करदात्या जनतेच्या पशातून जनतेसाठी बांधण्यात आलेल्या रस्त्यांवर, ते रस्ते स्वत:ला आंदण दिल्यासारखे नागरिकांच्या विरोधाची पर्वा न करता राजकीय लाभासाठी वापरणे हे लोकशाही प्रगत समाजाला लागलेले ग्रहण होय.
सर्वत्र वाहतूक कोंडी, उखडलेले रस्ते, त्यातून लोंबणारे पाइप, केबल्स, रस्त्यावरील खड्डे, गटाराची तुटकी झाकणे, कचऱ्याचे ढीग, भटकी गुरे, दहशत निर्माण करणारे भटके कुत्रे या सर्व रस्त्यावरील त्रासामुळे सर्वसामान्य जेरीस आला आहे. या समस्या सोडविण्याऐवजी नेते मात्र रस्ते आंदण दिल्यासारखे श्रद्धाळू, भोळ्याभाबडय़ा लोकांच्या धार्मिक, सांस्कृतिक गरजा भागविण्याची उठाठेव करत आहेत.
उत्सवांद्वारे मिळालेली संस्थाने अभेद्य ठेवण्यात त्यांना अधिक स्वारस्य. जनतेला रस्त्यावर नाचवून स्वत:ला छोटय़ा पडद्यावर चमकविण्याचा नेतेमंडळींचा हा हव्यास त्यातील अर्थकारण त्यांना स्वत:लाच मोठे करण्यासाठी असतो. उत्सवामुळे होणारे ध्वनिप्रदूषण, कायदा धाब्यावर बसवून केलेली कृत्ये, त्यातील अर्थकारण, राजकारण आदी बाबी माध्यमांकडून उजेडात येत नाहीत. मुंगीचासुद्धा शिरकाव होणार नाही अशा अलोट गर्दीमुळे त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांपकी कोण आजारी, अत्यवस्थ व्यक्तीला, गर्भवती स्त्रीला तातडीने इस्पितळात न्यायचे झाल्यास जिवावर बेतणार, तसेच कोणाचे मयत झाले तरी आणीबाणीचा प्रसंग ओढवणार. हा विचार सार्वजनिक रस्ते आपली जहागिरी असल्याच्या गुर्मीत वावरणारे करत नाहीत. सर्वसामान्य जनतेनेच आता रस्त्यावरील या राजकीय िधगाण्यावर बहिष्कार टाकावा, हे भले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा