‘बालभारती’च्या पुस्तकात वा. भा. पाठक यांची एक छान कविता होती. ‘खबरदार जर टाच मारूनी..’ सावळ्या हा तिचा नायक. तो शिवकालातला. लहान मुलगा. पण तो म्हणजे स्वामीभक्तीचे, कर्तव्यपरायणतेचे, शौर्याचे प्रतीकच. आता मुळात सावळ्या हे काल्पनिक पात्र. पाठक यांनी ते तयार केले आणि मुलांसमोर एक आदर्श ठेवला. मुलांनी कविता वाचावी. सावळ्याचे गुण आपल्या अंगी बाणवावेत. हा हेतू. सोव्हिएत रशियातल्या पावलिक मोरोझोव्हचे तसे नव्हते. म्हणजे तो सावळ्यासारखाच लहान मुलगा होता. परंतु खराखुरा. सोव्हिएत रशियात त्याचे पोवाडे गायले जात होते. मुलांना त्याच्या कथा सांगितल्या जात असत. शाळाशाळांमध्ये त्याचे पुतळे बसविण्यात आले होते. मुलांच्या छातीवर त्याचे चित्र असलेले बिल्ले असत. फार काय, त्याच्यावर एक ऑपेराही रचण्यात आला होता. पुढे तर चित्रपटही काढण्यात आला त्याच्यावर. लाडाने त्याला कोणी पाशा म्हणे, कोणी पावलुश्का, तर कोणी नुसतेच पाश. कोण होता तो?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा