हिटलरने जर्मनी हे राष्ट्र एक केले. बलिष्ठ केले. तेथे आर्य संस्कृती प्रस्थापित केली. महिलांचे स्थान घरात. त्यांनी छान गुटगुटीत बालकांना जन्म द्यावा. त्यांचे पालनपोषण करावे. वंश वाढवावा आणि पुरुषांनी बाहेरच्या जगात पराक्रम गाजवावा, ही त्याची शिकवण. वंश हा रक्तातूनच प्रवाहित होत असतो. तेव्हा रक्त शुद्ध राहणे महत्त्वाचे. हा शुद्ध वंश म्हणजे जर्मन आर्याचा. तो महत्त्वाचा; पण आजवर त्यालाच दडपण्याचे प्रयत्न झाले. सारे जग त्याच्याविरुद्ध होते. त्यात पुढाकार ज्यूंचा. त्यांनी जर्मन राष्ट्राला पंगू बनविले. अत्यंत घातकी, धूर्त, लबाड आणि क्रूर अशी ती जात. त्यांना ठेचलेच पाहिजे. ते केले, तरच जर्मनी बलवान बनू शकेल. हे सगळे अमान्य असणारे लोक म्हणजे देशद्रोही. त्यात मार्क्सवादी आले, बोल्शेविक आले. त्यांनाही चेचले पाहिजे. तरच राष्ट्र बलवान होऊ शकेल. हा हिटलरचा, त्याच्या नात्झी तत्त्वज्ञानाचा सर्वसाधारण गोषवारा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा