‘यांचेही सरकार इतके साळसूद?’ हे पत्र (लोकमानस, १५ जुलै) वाचले. एखाद्या पत्रकाराने हाफीझ सईद याला भेटणे हे एक देशद्रोही वर्तन आहे, असा सूर पत्रातून व्यक्त होतो आहे. २६/११ चा हल्ला हा आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला होता हे मान्य करूनही त्या हल्लेखोराची नेमकी मानसिकता काय आहे, या हल्ल्यामागे कोणता राग आहे, संताप आहे हे जाणून घेणे चांगले की वाईट?
अनेक वेळा फाशीची शिक्षा झालेले, दरोडेखोर यांच्या मुलाखती प्रसिद्ध होतात तेव्हा आपण आक्षेप घेतो का? पत्रकाराचे कामच मुळी जगासमोर सत्य आणणे हे असते.
उद्या एखाद्या अशा आरोपीवर एखाद्या डॉक्टरने उपचार केले तर आपण अशीच हरकत घेणार का? हल्ल्याचे शल्य कुरवाळत बसण्यापेक्षा त्याच्या मुळापर्यंत जाणे हे सजग लोकशाहीचे आणि मानवतेचे लक्षण आहे.
सौमित्र राणे, पुणे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा