माधुरी पुरंदरे यांच्याविषयी दिलीप माजगावकर यांनी यथोचित लिहिलेले भाष्य (लोकसत्ता, २४ ऑगस्ट) वाचले. ते वाचून माधुरी पुरंदरे यांच्या मोबाइलवर शेकडो कॉल व एसएमएस आले असते, फेसबुकवर खूप पोस्ट आल्या असत्या, ट्विटर, व्हॉट्सअॅप, हाइक आदी सर्व साधनांवर संदेशांचा पाउस पडला असता.. पण यातले त्या काहीच वापरत नाहीत. साधा मोबाइल नाही की ईमेलसुद्धा नाही..
अनेक वष्रे पुण्यात राहूनही असे राहण्याबद्दल एक स्वतंत्र पुरस्कार देण्याची गरज आहे.
त्यामुळेच त्या इतके प्रकल्प करू शकल्या असाव्यात, हा तर्कही संवाद व्यसन असलेल्या अनेकांना पटेल. साधी मोबाइलची रेंज गेली तरी जग आपल्याला विसरेल की काय यासाठी धडपडणारे आम्ही, आणि दुसरीकडे कोलाहलात स्वत:चे वेगळेपण जपून काम करणारे माधुरी पुरंदरेसारखे लोक!
दिवंगत कवी अरुण कोलटकर, माधुरी पुरंदरे आदी लोकांना अनेकदा माहितीच्या युगाचे महत्त्व सांगितले जाते. ‘अपडेट’ राहण्याचा उपदेशही होत असेल.. पण आज या सर्व माध्यमांच्या अतिरेकामुळे आपले मूळचे विचार, कल्पना, व्यक्तिमत्त्व यावर किती प्रकारचे रोपण होते आणि आपण स्वत:चे मूळ गमावतो आहे का. त्यातून लोकानुरंजी होतो आहोत का, असा प्रश्न माधुरी पुरंदरे यांच्या निमित्ताने मनात आला!
या आपल्या माध्यम अतिरकाने व्रतस्थता, दीर्घ काही काम करण्याची क्षमताच मारली जाते आहे का, याचा खरंच विचार करायची वेळ आली आहे.
– हेरंब कुलकर्णी, अकोले (अहमदनगर )
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा