‘शिवसेना- मनसेसोबत पवारांची नवी आघाडी?’ ही बातमी (लोकसत्ता, ७ ऑक्टो.) वाचली. याबाबतचा माझा होरा खरा ठरेल असे मला अजूनही वाटते व तसा आशय वरील बातमीत दिसतो. युती तुटण्याचे राजकीय विश्लेषण करणे जरी सोपे नसले, तरी राजकारण हा सत्ताबजार आहे, हे महाराष्ट्रातील मतदारांना पुन्हा एकदा पटले आहे.
पवारांनी वेळोवेळी खेळलेल्या राजकारणातील खेळी पाहता असे वाटणे साहजिक आहे. युती तुटली (की तोडली?) की त्रिशंकू स्थिती होईल व अशा वेळी शिवसेनेला पाठिंबा देऊन (उद्धव ठाकरेंनाच पद देऊन?) महाराष्ट्रातील सत्तेत आपले राजकीय अस्तित्व टिकून राहावे यासाठी तरी हे सर्व घडते आहे की काय, असा संशय (पवारांच्या हालचाली पाहता) आल्यास गर नाही. मनसेची भूमिका ‘जिथे सत्ता तिथे आम्ही व त्यासाठी काहीही’ अशी असल्यामुळे ते समीकरणात कुठल्याही बाजूला जातील हे आपण नाशिकच्या अलीकडच्या घडामोडीत पाहिले आहेच.
सुरेश जाधव, अंधेरी (मुंबई)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा