योगामुळे मानसिकता बदलेल, पण गैरव्यवस्थाही बदलावीच..
राज्यातील मोठय़ा तुरुंगातील कैद्यांना तेथील गरव्यवस्थे मुळे मानसिक आजार जडण्याचे प्रमाण वाढत असल्याचे वृत्त (लोकसत्ता, १ जून) वाचले.तुरुंगातील कोंडवाडय़ांत क्षमतेपेक्षा जास्त कैदी, तेथील कष्टाचे जीवन यामुळे हे आजार जडत आहेत व त्यावर योग व प्राणायाम आदी उपचार देण्यात येणार आहेत, असेही या वृत्तात म्हटले आहे.
तुरुंगातील कैद्यांना मानसिक आजार जडण्यास तेथील गरव्यवस्था कारणीभूत असल्याने योग व प्राणायाम आदी उपचार देताना भोवताल च्या परिस्थितीमधील गरव्यवस्था दूर करणे देखील तितकेच गरजेचे आहे. अनेकदा मानसिक आजार जडण्यास भोवतालची परिस्थिती कारणीभूत असते. कुटुंबीय व/वा समाजाकडून होणारा टोकाचा अन्याय, त्याबद्दल झालेली सातत्याची मुस्कट दाबी, शारीरिक मानसिक गरजा न भागल्याने होणारा कोंडमारा व कुचंबणा, संघर्षमय जीवन, त्यातील कोलाहल, रोजच्या आयुष्यातील प्रश्न सोडवताना झालेली दमछाक, त्यात आलेले अपयश व सरतेशेवटी नराश्य अशी अनेक कारणे मुळात गुन्हा घडण्यासाठी पुरेशी असतात. कोणत्याही आजारावर वेदनाशामक औषधां सोबत आजाराचे मूळ कारण शोधून त्यावर इलाज करणे हे अधिक गरजेचे असते.
योग, प्राणायाम यामुळे पीडित व्यक्तीचे मन शांत राहून परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता वाढत असली तरी आजाराची मूळ कारणीभूत परिस्थिती त्यामुळे अर्थातच बदलत नाही. ती तशीच प्रतिकूल व अन्यायकारक राहते. मानसिक आजार झालेल्या पीडित व्यक्तींवर उपचार करताना मानसिक स्वास्थ्यासाठी अन्यायकारक, कुचंबणा करणारी परिस्थिती हटविणे त्याहून अधिक गरजेचे व सामाजिक न्यायाचे असते.
रजनी अशोक देवधर, ठाणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा