नदीचं पाणी वेगानं वाहात असताना क्षणोक्षणी खरं तर प्रवाहित होणारं पाणी नवंच असतं, पण मला ते जाणवत नाही. त्याचप्रमाणे सतत बदलत असलेलं जग मला स्थिर वाटतं, अनित्य असलेलं जग मला नित्य वाटतं, अशाश्वत जग मला शाश्वत वाटतं. इतकंच नव्हे तर जगालाच मी शाश्वत सुखाचा, नित्य सुखाचा आधार मानत असतो. जगाचं माझं आकलन भ्रामक असतं. विपरीत असतं. आकलनच विपरीत असल्यानं त्या जगाशी होणारा माझा व्यवहारही विपरीतच होतो. प्रभू अर्जुनाला सांगतात, ‘‘जाणणेंचि विपरीतें। जें जें कांहीं जाणिजतें। जें प्रतिक्षणीं निमतें। होऊनियां।। अगा काढूनि भ्रांतीचें दांग। उभवी सृष्टीचें आंग। हें असो बहु जग। जया नाम।।’’ (अध्याय १५/ ओव्या ४८२, ४८३). म्हणजे, विपरीत ज्ञानानंच या जगातली प्रत्येक गोष्ट जाणली जाते. या जगात क्षणोक्षणी निर्मिती होते आणि क्षणोक्षणी तिचा नाश होत असतो. कल्पनेतूनच आकार निर्माण व्हावेत आणि ती सृष्टी विराट भासू लागावी त्याप्रमाणे हे जग माझ्या मनावर प्रभाव पाडत असतं. एकदा एका साधकानं श्रीनिसर्गदत्त महाराजांना जगाबद्दल काही प्रश्न केला. महाराजांनी विचारलं, तुम्ही कोणत्या जगाबद्दल बोलता आहात? तो आश्चर्यानं आणि काहीशा त्राग्यानं म्हणाला, ज्या जगात तुम्ही आणि मी राहत आहोत त्या जगाबद्दल. यावर महाराज उत्तरले, तुम्ही तुमच्या जगात आहात. तुमचं जग तुमच्या कल्पनेनुसार बनलेलं आहे आणि त्या जगाची तुमच्याखेरीज कुणाला कल्पनाही येऊ शकत नाही! महाराजांचं उत्तर वरकरणी कळणारच नाही. प्रत्यक्षात त्यांनी शुद्ध वास्तव सांगितलं. याच जगात आपणही वावरतो आणि संतही वावरतात. तरी ते जगाकडे कसं पाहतात आणि आपण कसं पाहतो? आपण आपल्या स्वार्थाच्या भिंगातूनच जगाकडे पाहत असतो आणि आपल्या स्वार्थानुसारच जगाकडून अपेक्षा ठेवत असतो. संत जगाचं वास्तविक स्वरूप जाणतात, या जगाची वास्तविक समस्या आणि तिच्यावरचा वास्तविक उपाय जाणतात आणि त्यासाठीच अहोरात्र कार्यरत असतात. आपल्या जगाकडून अवास्तव, भ्रामक आणि मोहजन्य कल्पना असतात. त्या कल्पनांच्या पूर्तीतच आपण सुख मानत असतो आणि त्यांच्या अपूर्तीनं दु:खी होत असतो. जग जसं आहे तसं मी जगाकडे पाहत नाही. जग जसं आहे तसं जाणून जगाशी व्यवहार करत नाही. त्यामुळेच या जगात अवास्तव अपेक्षांपायी मला अपेक्षाभंगाचं दु:ख भोगावं लागतं. माझं जग माझ्या कल्पनेनं सजलेलं आहे आणि त्या काल्पनिक जगातच मी कैद आहे. हे जग क्षणोक्षणी बदलत आहे. अर्थात या जगाकडूनच्या माझ्या अपेक्षाही क्षणोक्षणी बदलत आहेत. माझ्या मनाजोगती एखादी गोष्ट झाली तरी ती मला नित्य नको असते. तिच्यापेक्षा पुढची गोष्ट मला हवीशी वाटते किंवा तिच्यातली गोडी संपून ती गोष्ट नकोशीदेखील होते. त्यामुळे मनाची हाव कधीच संपत नसल्यानं या जगातली माझी वणवण कधीच संपत नाही. वणवण संपत नाही म्हणून खरा आराम कधीच मिळत नाही. समर्थही सांगतात, बहु हिंडता सौख्य होणार नाही, शिणावे परी नातुडे हित काही!

Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
When will daily water supply be provided to Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडला दररोज पाणीपुरवठा कधी होणार? आयुक्तांची महत्वाची माहिती
All-party leaders oppose recommendation to change formula for equitable water distribution in Jayakwadi dam
जायकवाडी समन्यायी पाणी वाटपाचे सूत्र बदलण्याच्या शिफारशीच्या विरोधात सर्वपक्षीय नेते
17 percent water loss from 65 major irrigation projects in Maharashtra state
धरणांमधील १७ टक्के पाणी वाया! कालव्यांची दुरवस्था, बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगाचा परिणाम
new pamban bridge
समुद्रात उभारलेला पंबनचा जुना पूल वर्षांनुवर्ष टिकला; नवीन पुलाचं आयुष्य ५८ वर्षच का?
Ashutosh Joshi Konkan Nature Raigad
…एक पत्थर तो तबियत से उछालो यारो
Hair loss and baldness cases reported in 11 Shegaon villages unsafe water found in Matargaon
टक्कलग्रस्त माटरगावमधील पाणी अपायकारक! ‘नायट्रेट’चे जास्त प्रमाण
Story img Loader