‘लबाडाघरचे आवतण’ हा अग्रलेख (२८ ऑगस्ट) वाचला. भारतात सध्या असुरक्षिततेचे वातावरण आहे. महिला, अंधश्रद्धाविरोधक, माहिती अधिकारात भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे किंबहुना रुपयादेखील सुरक्षित नाही.. परंतु अन्न सुरक्षा कायदा करून सरकार किंवा मनमोहन सिंग नव्हे तर सोनिया गांधी ‘आम आदमी’च्या नजरेत सुरक्षित होण्यासाठी केविलवाणा प्रयत्न मात्र करीत आहेत. १९४० साली बंगालचा दुष्काळ पडल्यावर जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी रेशन व्यवस्थेचा पाया घातला गेला, त्याच्या अंमलबजावणीत स्वातंत्र्योत्तर काळात येत असलेले अपयश सरकारने हा कायदा पारित करून कबूल केले आहे. अन्यथा रेशन व्यवस्था ही गरिबाला गहू, तांदूळ, साखर व केरोसीन देतच होती ना? सध्याच्या रेशन व्यवस्थेतील भ्रष्टाचार या अन्नसुरक्षा कायदय़ामुळे दूर होईल अशी अशा बाळगणे चुकीचे ठरेल. उलट, भ्रष्टाचार एवढा वाढेल की सरकारी लेखा परीक्षकांचे कामही वाढेल. थोडय़ाच दिवसांपूर्वी गरिबी ही एक मानसिकता आहे असे म्हणणारे राहुलबाबा यांचे बहुमोल विचारही त्यांच्या मातोश्री सोनिया यांनी या कायद्याने खोडून काढले काय?
प्रवीण आंबेसकर, ठाणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा