सत्य, अिहसा, न्याय, करुणा या तत्त्वाचे प्रतीक मानला जाणारा महात्मा गौतम बुद्ध यांच्या बोधगयेतच दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडविले. काही राजकीय मंडळी या घटनेला धार्मिक आणि जातीय रंग देत आहेत. परंतु दहशतवादाचा कुठलाही रंग नसतो. सार्वजनिक ठिकाणी किंवा हिंदूंच्या धार्मिक स्थळी बॉम्बस्फोट झाले की संशयाची सुई मुस्लिमांकडे जाते. मुस्लिमांच्या धार्मिक स्थळी स्फोट झाले तर शंका काही कट्टर हिंदू संघटनांकडे जाते. खरे तर दहशतवादाला कुठलीही जात-धर्म-रंग नसतोच. त्यांची एकच जात असते, ती म्हणजे मानवताविरोधी. बोधगया येथे झालेल्या साखळी स्फोटाकडे जागतिक दहशतवादाची समस्या म्हणून पाहणे गरजेचे आहे.
-सुजित ठमके, पुणे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा