शिक्षणाला नापास ठरवणारी गुणपत्रिका ही बातमी वाचली.(लोकसत्ता, १४ नोव्हे). ही बातमी कितीही चटपटीत वाटली तरी यातून दिला जाणारा संदेश हा अतिशय धोकादायक आहे.
एकूण बातमीचा रोख हा शिक्षणाला दुय्यम मानणारा आहे. पुस्तकी शिक्षणाच्या मर्यादा मान्य करूनही औपचारिक शिक्षणाचे आपल्या आयुष्यात काही महत्त्व आहे हे नाकारता येणार नाही.
सर्वाना नम्र वाटणारा सचिन परीक्षेत अपयश आल्याने गुणपत्रिका वैतागून फाडून फेकून देतो हे पराभूत मनोवृत्तीचे लक्षण आहे.
आणखी एक मुद्दा : क्रिकेटमध्ये तो यशस्वी झाला म्हणून त्याचे शिक्षण किती हा प्रश्न आला नाही,पण दुर्दैवाने तसे झाले नसते तर हेच गुणपत्रिकांचे तुकडे त्याला शोधायला लागले असते, पुन्हा अर्ज करण्यासाठी. शिक्षण नापास नाही ठरत, नापास ठरते आपली चिकाटी, आपली निष्ठा आणि आपली ज्ञानग्राहकता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा