माकडाच्या हातात कोलीत, चेव सुटणे असल्या म्हणी/ वाक्प्रचार फक्त भारतीय समाजासाठी थोडय़ाच आहेत? आम्ही सारे कमालीच्या शिस्तीत वाढलेले आहोत. बौद्धिकवर्गातील शिस्त ही सरकारच्या दुसऱ्या पाच वर्षांच्या कालावधीत समाजात येणारच, असा नेत्याचा समज होण्यात चूक ती काय? किती दाब असेल ना प्रेशरकुकर सारखा, घरात बसण्याचा. पाच वाजता शिट्टी वाजवून वाफ बाहेर काढा, असे म्हटले होते. पण आपल्याला दम कोठे निघतो? आता विषाणूची लक्षणे दिसण्याचा काळ १४ दिवसांचा आहे. पण मग तेवढे दिवस घरात बसायचे कसे, किती उद्योगी समाज आहोत आपण. सकाळी उठल्या-उठल्या गायछाप किंवा सूरजचा तोटा फोडून दोन्ही हातानी तंबाखू मळण्यापासून ते रात्रीच्या नारंगी रंगाच्या पाण्याची हौस करण्यासाठी वाट्टेल ते करण्याची आपली तयारी असते. हो, आणि काही जण असतात शंख वाजवणारेसुद्धा. शंखामुळे विषाणू नष्ट होतात, असाही त्यांचा समज असतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा