एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय चित्रच बदलले. राजकीय अस्थिरता निर्माण झाली. मंत्रीपदे वाचतात का याची मंत्र्यांना धास्ती. मंत्र्यांच्या सचिवांना आपले काय, याची वेगळीच भीती. भाजप नेत्यांची आशा पल्लवित झालेली. या साऱ्या घडामोडी घडत असताना काँग्रेसमध्ये मात्र वेगळेच वातावरण. कारण विधान परिषद निवडणुकीत पक्षाचे पहिल्या क्रमांकाचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले तर दुसरे उमेदवार भाई जगताप विजयी झाले. हंडोरे यांना पहिल्या पसंतीच्या २९ मतांचा कोटा देण्यात आला होता. पण त्यांना २२ मतेच मिळाली. यावरून सात मते फुटल्याचे सिद्ध झाले. हंडोरे यांच्या पराभवामुळे काँग्रेसला आणखी वेगळीच भीती. हंडोरे यांच्या पराभवामुळे दलित समाजात नाराजी उमटू शकते. शिंदे यांच्या बंडाचीच चर्चा सुरू झाली. परिणामी हंडोरे यांचा पराभव दुर्लक्षित राहिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा