पाकिस्तान्यांना धूळ चारून जिंकलेल्या बांगलादेश युद्धाची चर्चा व काहीशी झिंगसुद्धा त्यानंतरच्या सुमारे वर्षभरात कायम राहिलेली असतानाच, १९७२ सालच्या डॉ. आंबेडकर जयंतीला चंबळच्या खोऱ्यातील ४५० डाकूंनी महात्मा गांधी यांच्या तसबिरीपुढे शस्त्रत्याग केला! कबूल की, १९५५ सालच्या दिलीपकुमारच्या ‘आझाद’पासून ते ‘मदर इंडिया’ (१९५७), ‘जिस देश मे गंगा बहती है’ (१९६०), ‘मुझे जीने दो’ (१९६३) अशा कित्येक हिंदी सिनेमांनी ‘डाकू चांगलेही असू शकतात- त्यांचे हृदयपरिवर्तन घडू शकते’ हेच दाखवले होते; पण खऱ्याखुऱ्या डाकूंचे हे मनपरिवर्तन- आणि पर्यायाने व्यवसायात बदलसुद्धा- घडवण्यामागे १९५४ सालापासून एस. एन. सुब्बाराव यांनी केलेले प्रयत्न होते. १९७० सालापासून तर राजस्थान, उत्तर प्रदेश ते मध्य प्रदेश या राज्यांतले अख्खे चंबळ खोरे कधी उंटावरून तर कधी पायी फिरून सुब्बाराव यांनी पिंजून काढले होते. पुढे एकंदर ६५७ डाकू तीन राज्यांतून शरण आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा