गोव्याच्या नितांतसुंदर भूमीत अनेक नररत्ने जन्माला आली, ज्यांनी विविध क्षेत्रे आपल्या कार्याच्या दीप्तीने झळाळून सोडली. अशांपैकी एक भिकू पै आंगले. गोव्यात जन्मलेले भिकूबाब शिक्षणाकरिता मुंबईत आले आणि मग शैक्षणिक क्षेत्र हीच त्यांनी आपली कर्मभूमी निवडली. जगाच्या कानाकोपऱ्यांत विखुरलेले आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने चमकणारे अनेक विद्यार्थी त्यांनी घडविले. विद्यार्थ्यांवर केवळ शैक्षणिक संस्कार न करता त्यांनी नैतिकता आणि तत्त्वनिष्ठेचे बीजही त्यांच्यात रुजवले. गोव्याच्या भूमीतले नाटय़वेड ‘धि गोवा हिंदु असोसिएशन’च्या सक्रिय कार्यकर्त्यांच्या रूपात त्यांनी वृद्धिंगत केले. नाशिकला प्राचार्य असताना त्यांचा नाटककार वसंत कानेटकर यांच्याशी स्नेह जुळला. तोवर ‘पीडीए’साठी नाटके लिहिणाऱ्या कानेटकरांना त्यांनी ‘गोवा हिंदु’साठी नाटक लिहिण्याची गळ घातली. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे त्याचेच फलित. पुढे ‘गोवा हिंदु’साठी कानेटकरांनी अनेक नाटके लिहिली. भिकूबाबनी वि. वा. शिरवाडकरांनाही ‘गोवा हिंदु’त नाटककार म्हणून आणले. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘सं. मत्स्यगंधा’ आदी नाटकांतून भिकूबाबनी साहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका निभावली. राज्य नाटय़स्पर्धेत ‘खडाष्टक’मध्ये, तसेच ‘लेकुरे उदंड जाली’सारख्या नाटकांतून त्यांनी भूमिकाही केल्या. नाटकातील बदली कलाकारांच्या तालमी घेण्यात ते माहीर होते. एका अर्थाने तालीम मास्तरच म्हणा ना! नाशिकहून नाटकांच्या प्रयोगासाठी ये-जा करताना त्यांनी संस्थेकडून एक पैसाही कधी घेतला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा