“काळवीटाची शिकार केली नसेल तरी बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन…”, सलमान खानला कोणी दिला सल्ला?
बॉलीवूड अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्याच्या मित्र बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. भजन सम्राट अनुप जलोटा यांनी सलमानला बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले की, सलमानने काळवीटाची शिकार केली असो वा नसो, माफी मागून वाद मिटवावा आणि सुरक्षित आयुष्य जगावे.