बिग बींच्या अफेअर्सबद्दल बोलण्याचे निमंत्रण आल्यावर त्यांचे सासरे म्हणालेले…
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे लग्न १९७३ साली झाले. त्यांच्या लग्नानंतर जया यांच्या वडिल, प्रतिष्ठित पत्रकार तरुण कुमार भादुरी यांच्या आयुष्यात मोठे बदल झाले. त्यांनी १९८९ मध्ये 'इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया'साठी लेख लिहून या बदलांची माहिती दिली. लोक त्यांना अमिताभ यांचे सासरे म्हणून ओळखू लागले. अनेक कार्यक्रमांसाठी निमंत्रणं येऊ लागली. तरुण कुमार भादुरी यांनी सांगितले की, हे सर्व त्यांच्या कर्तृत्वामुळे नव्हे तर अमिताभ यांचे जावई असल्यामुळे होतं.