जिद्द असावी तर अशी! एकदा दोनदा नाही तर तब्बल तीनवेळा हरली; चौथ्या प्रयत्नात कशी झाली IAS
Success Story of Arpita Thube: केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) नागरी सेवा परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार नागरी सेवेत सामील होण्याचे स्वप्न पाहतात. पण, या कठीण प्रवासात काही मोजकेच लोक यशस्वी होतात. बरेच लोक काही कारणास्तव हार मानतात. तर काहीजण त्यांच्या अढळ समर्पणाने आणि कठोर परिश्रमाने एक आदर्श निर्माण करतात. याचच एक उदाहरण म्हणजे आयएएस अधिकारी अर्पिता थुबे.