सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतींना निर्देश देऊ शकत नाही; उपराष्ट्रपतींनी व्यक्त केला संताप
सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठवलेल्या विधेयकांवर निश्चित कालमर्यादेत निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले होते. यावर उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी नाराजी व्यक्त करत न्यायालयावर टीका केली. त्यांनी न्यायालये सुपर संसद झाल्याचा आरोप केला. तमिळनाडू सरकारच्या विधेयकांवरून झालेल्या या वादात धनखड यांनी न्यायालयाच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि संविधानाच्या मर्यादेत राहून काम करण्याचे आवाहन केले.