दारूबंदी असलेल्या राज्यात विषारी दारूमुळे मृत्यूंचं तांडव, बिहारमध्ये नेमकं काय घडलं?
बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने २५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून अनेकांनी दृष्टी गमावली आहे. या प्रकरणी १२ लोकांना अटक करण्यात आली आहे. विरोधी पक्षांनी हा हत्येचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. खेरवा परिसरातील मुसहरी टोला गावात प्रत्येक घरात शोककळा पसरली आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी सत्ताधारी नेते, पोलीस आणि माफियांच्या संगनमताने दारूबंदी फक्त कागदावर असल्याचा आरोप केला आहे.