“पर्यावरण संरक्षण कायदा दंतहीन”, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे!
दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाने पर्यावरण संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीबाबत केंद्राला १० दिवसांची मुदत दिली आहे. पंजाब सरकारलाही कारवाई न केल्याबद्दल फटकारले आहे. दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब असून, पुढील दोन दिवसांत प्रदूषण पाच पटीने वाढण्याची शक्यता आहे. न्यायालयाने कठोर आदेश जारी करण्याचा इशारा दिला आहे.