“चीप माल हवा असेल तर चीनला जा, भारतात…”, रेमंडच्या संचालकांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
रेमंडचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी चीनच्या आर्थिक प्रगतीबद्दल बोलताना, दर्जाच्या बाबतीत चीन अद्याप मागे असल्याचे म्हटले. बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे रेमंड भारतात सर्व यंत्रणा हलवण्याचा विचार करत आहे. भारतातील वितरण व्यवस्था उत्तम असल्याने उत्पादन ग्राहकांपर्यंत जलद पोहोचेल. जागतिक बाजारपेठेत China+1 धोरणानुसार भारत हा उत्तम पर्याय असल्याचे सिंघानिया यांनी नमूद केले.