“लाडूविषयी मी बोलावं अशी देवाची इच्छा असेल”, चंद्राबाबू नायडू यांचं विधान चर्चेत!
आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या तुपात माशांच्या तेलाचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. या आरोपामुळे राज्यात राजकारण तापले आहे. नायडू म्हणाले की, परमेश्वराची इच्छा होती की मी हे सत्य उघड करावे. त्यांनी तुपाच्या गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्यांना राज्य सरकार सोडणार नाही, असा इशाराही दिला.