LAC बाबत भारत आणि चीनमध्ये महत्त्वाचा करार, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती!
भारत आणि चीनमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याबाबत नवीन करार झाला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले की, गेल्या काही आठवड्यांपासून राजनैतिक आणि लष्करी स्तरावर चर्चा सुरू आहे. २०२० मध्ये उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी गस्तीची व्यवस्था करण्यात आली आहे. देपसांग आणि डेमचोक भागातील गस्त व्यवस्थेशी संबंधित हा करार आहे. भारत-चीन संबंधांना जागतिक आणि धोरणात्मक महत्त्व आहे.