“भाजपा-संघाचे कान धरुन जातनिहाय जनगणना करुन घेऊ”, लालूप्रसाद यादव यांची टीका
देशात जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर चर्चा सुरू आहे. इंडिया आघाडीतील पक्षांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे. भाजपाने मात्र ही मागणी हिंदू धर्मात फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली आहे. राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनी संघ आणि भाजपावर टीका करत, जातनिहाय जनगणना करण्याची गरज व्यक्त केली आहे.