“भारतीय समाजात नणंद-भावजयांचं नातं खास”, न्यायाधिशांकडून मिश्किल टीप्पणी!
अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका महिलेने तिच्या भावाच्या पत्नीविरोधात दाखल केलेली तक्रार रद्द केली. दोन्ही पक्षांनी वाद मिटवण्यासाठी करार केला होता. न्यायालयाने नणंद-भावजयांच्या नातेसंबंधाविषयी मिश्किल टिप्पणी केली. न्यायालयाने तक्रार प्रकरण रद्द करताना पक्षकारांना हजार रुपये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात जमा करण्याचे निर्देश दिले. न्यायाधीशांनी नणंद-भावजयांचं नातं वेगळं असतं अशी टिप्पणी केली.