बदलापूर प्रकरणावर मोदींची प्रतिक्रिया; सरन्यायाधीशांसमोर म्हणाले, “जितक्या लवकर…”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत आयोजित जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेत महिलांविरोधातील अपराधांवर भाष्य केलं. त्यांनी पीडित महिलांना त्वरित न्याय मिळावा, असं मत मांडलं. कोलकाता व बदलापूरमधील घटनांच्या पार्श्वभूमीवर मोदी म्हणाले, महिलांवरील अत्याचार व लहान मुलांची सुरक्षा गंभीर विषय आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेवरही भाष्य केलं.