“भाषेचा अभिमान असेल तर किमान स्वत:ची सही…”, पंतप्रधान मोदींचं तामिळनाडूत विधान!
गेल्या काही महिन्यांपासून प्रादेशिक भाषा आणि राष्ट्रीय भाषा यावरून तामिळनाडू विरुद्ध केंद्र सरकार असा वाद सुरू आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणातील तीन भाषा धोरणाला तामिळनाडूने विरोध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामेश्वरममध्ये पंबन पुलाच्या उद्घाटनावेळी तामिळनाडू सरकारवर टीका केली. त्यांनी तामिळ भाषेचा अभिमान असल्यास तामिळ भाषेत सही करण्याची विनंती केली. तामिळनाडूने दोन भाषा धोरण स्वीकारले असून केंद्र सरकार हिंदीची सक्ती करत असल्याचा आरोप केला आहे.