“राजकारणापासून किमान देवांना तरी दूर ठेवा”, सुप्रीम कोर्टाची टिप्पणी; तिरुपती प्रकरणावर…
गेल्या काही दिवसांपासून तिरुपती देवस्थानातील प्रसाद लाडूंच्या तुपात जनावरांची चरबी आढळल्याचा आरोप चर्चेत आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असून, न्यायालयाने "देवांना राजकारणापासून दूर ठेवा" अशी टिप्पणी केली. तपास अहवालानुसार, भेसळयुक्त तूप प्रसादासाठी वापरले गेले नाही. न्यायालयाने केंद्र सरकारला चौकशीसंदर्भात उत्तर देण्याचे निर्देश दिले असून, पुढील सुनावणी ३ ऑक्टोबरला होणार आहे.