‘औरंगजेबपूर’ झालं ‘शिवाजी नगर’, उत्तराखंडमधील १५ ठिकाणांची नावं बदलली!
उत्तराखंडमधील सत्ताधारी पुष्कर सिंह धामी सरकारने राज्यातील १५ ठिकाणांची नावं बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हरिद्वार, डेहराडून, नैनीताल व उधम सिंह नगर या जिल्ह्यांतील ठिकाणांचा समावेश आहे. लोकभावना, भारतीय संस्कृती, ऐतिहासिक वारसा यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. शिवाजी नगर व ज्योतिबा फुले नगर यासारख्या नावांचा समावेश आहे. भाजपाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.