“राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुळीच एकत्र येऊ नये, कारण..”; अमित ठाकरे काय म्हणाले?
माहीममधून अमित ठाकरे यांना मनसेने उमेदवारी दिली आहे. अमित ठाकरे यांनी माहीममध्ये बदलाची गरज असल्याचे सांगितले आहे. त्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊ नये असे मत व्यक्त केले. २०१७ मध्ये शिवसेनेने सहा नगरसेवक फोडल्यामुळे त्यांचा आदित्य ठाकरे यांच्याशी संवाद नाही असंही म्हणाले. अमित ठाकरे यांनी आत्मविश्वासाने निवडणूक जिंकण्याची खात्री व्यक्त केली.