“छत्रपती शिवरायांची १०० वेळा माफी मागायला तयार, पण…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य
सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आणि दोन समित्या स्थापन केल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना राजकारण न करण्याचे आवाहन केलं आहे. तसंच घडलेल्या घटनेसाठी मी शिवरायांची १०० वेळा माफी मागायला तयार आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.