मविआच्या फॉर्म्युल्यात १५ जागांचा हिशेबच नाही; या जागांचं काय होणार? वडेट्टीवार म्हणतात…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती, महाविकास आघाडी, मनसे, वंचित बहुजन विकास आघाडी आणि तिसरी आघाडी यांनी जागावाटप व उमेदवारांची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीने २७३ जागांचे गणित जाहीर केले, परंतु उरलेल्या १५ जागांबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, या जागा मित्रपक्षांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत आणि काँग्रेसच्या जागा १०० ते १०५ दरम्यान असतील.