“महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली..”, माजी मुख्यमंत्र्यांचा दावा
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून, अद्याप तारीख जाहीर झालेली नाही. महाविकास आघाडीने १७५-१८० जागा जिंकण्याचा दावा केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वर्तवली आहे. सध्याच्या परिस्थितीत सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, राष्ट्रपती राजवट लागू करून निवडणुका पुढे ढकलण्याची हालचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.