“महायुतीने आमचा विचार केला नाही”, रामदास आठवलेंनी व्यक्त केली नाराजी
महायुतीचं जागावाटप सुरू झालं असून बहुतेक जागांवर उमेदवार जाहीर झाले आहेत. रिपब्लिकन (आठवले गट) पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चार-पाच जागांची मागणी केली. त्यांनी धारावी किंवा चेंबूरच्या जागेवर आग्रह धरला आहे. रिपब्लिकन पक्षाकडे मोठं समर्थन असूनही महायुतीच्या नेत्यांनी त्यांचा विचार केला नसल्याचं आठवले म्हणाले.