“बटेंगे तो कटेंगे”, मुंबईत योगींच्या घोषवाक्यांचे पोस्टर्स; भाजपाची नेमकी योजना काय?
मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांच्या "बटेंगे तो कटेंगे" घोषवाक्याचे पोस्टर लागले आहेत. भाजप समर्थक विश्वबंधू राय यांनी हे पोस्टर लावले असून, विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी हे घोषवाक्य वापरले जात आहे. हरियाणातील निवडणुकीत याचा यशस्वी वापर झाल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल.