भारत बांगलादेश कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ पंचांनी लवकर का संपवला?
भारत वि बांगलादेश पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने ५१३ धावांचे आव्हान दिले. चेन्नईतील खराब हवामाना आणि खराब प्रकाशामुळे सामना थांबवावा लागला. बांगलादेशने ४ बाद १५८ धावा केल्या होत्या. भारताकडून अश्विनने ३ आणि बुमराहने १ विकेट घेतली. पंत आणि गिलच्या शतकांच्या जोरावर भारताने मोठी धावसंख्या गाठली. तिसरा दिवस भारताच्या नावे राहिला.