भारत-बांगलादेश दुसरी कसोटी ड्रॉ होणार? पाऊस नसतानाही तिसऱ्या दिवसाचा खेळ का केला रद्द?
भारत वि बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस कानपूरमध्ये पावसामुळे रद्द करण्यात आला. पाऊस नसतानाही आऊटफिल्ड ओली असल्याने खेळ सुरू होऊ शकला नाही. शनिवारीही पावसामुळे खेळ रद्द झाला होता. ग्रीन पार्क स्टेडियममधील खराब ड्रेनेज सिस्टीममुळे मैदानावरील पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. आता दोन दिवसांचा खेळ शिल्लक असून, सामना ड्रॉ होण्याची शक्यता आहे.