ऑलिम्पियाड फिरता करंडक भारताकडून गहाळ,बुद्धिबळ महासंघाची बेफिकिरी
बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील सर्वोत्तम सांघिक कामगिरीसाठी देण्यात येणारा नोना गाप्रिंदाश्वाली फिरता करंडक भारताने दोन वर्षांपूर्वी जिंकला होता, परंतु आता तो हरवला आहे. जागतिक बुद्धिबळ महासंघाने करंडक परत करण्याची आठवण केल्यावर शोधाशोध सुरू झाली, पण अपयश आले. भारतीय बुद्धिबळ महासंघाने पोलिस तक्रार केली असून, पर्यायी करंडक तयार करण्याचे ठरवले आहे. ही परिस्थिती लाजीरवाणी असल्याचे महासंघाने मान्य केले आहे.