कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया चेन्नईत दाखल, विराट-रोहितचा विमानतळावरील VIDEO व्हायरल
बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ चेन्नईला पोहोचला आहे. १९ सप्टेंबरपासून मालिकेला सुरुवात होणार असून, त्याआधी सराव शिबिर होणार आहे. रोहित शर्मा, ऋषभ पंत, केएल राहुल, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली हे खेळाडू चेन्नईत दाखल झाले आहेत. विराट कोहली लंडनहून थेट चेन्नईला पोहोचला. भारतीय संघात १६ खेळाडूंचा समावेश आहे.