“चांगली माणसं मारली गेली तरी चालेल, पण..”, शिंदे गटाच्या नेत्याचं विधान!
बदलापूरमधील चिमुकल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर महाराष्ट्रभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिंदे गटाचे नेते नानकराम नेभनानी यांनी महिलांना स्वसंरक्षणासाठी रिवॉल्व्हर देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या विधानावरून वाद निर्माण झाला आहे. अमृता फडणवीस यांनी या मागणीला विरोध दर्शवला असून, शस्त्र वापराऐवजी दीर्घकालीन उपायांची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.