“…तेव्हा महाविकास आघाडीत वाद होऊ शकतात”, जयंत पाटील असं का म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीत जागावाटपावर चर्चा होईल तेव्हा वाद होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, वाद मिटवून एकमेकांना समजून घेण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही महाविकास आघाडीच्या बैठकीत मुंबईतील ९९ टक्के जागांवर सहमती झाल्याचे सांगितले.