शिंदे सरकारने किक्रेटपटूंना जाहीर केलेली बक्षीस अद्यापही दिलं नाही – जितेंद्र आव्हाड
जून महिन्यात टी-२० विश्वचषक स्पर्धा जिंकल्यानंतर महाराष्ट्र सरकारने भारतीय संघातील खेळाडूंचा सत्कार केला होता. तसेच त्यांना ११ कोटी रुपयांचे बक्षिस जाहीर केलं होतं. त्यावेळी सरकारच्या या निर्णयाची बरीच चर्चाही झाली होती. मात्र, आता भारतीय संघातील खेळाडूंना बक्षिसांची ही रक्कम अद्यापही मिळाली नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसेच त्यांनी यावरून राज्य सरकारवर टीकाही केली आहे.