“शरद पवार, तुम्ही काय केलंत आयुष्यभर?”, भरसभेत राज ठाकरेंचा सवाल
राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोरेगाव येथे कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांनी पवारांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि महाराष्ट्राच्या जनतेला विचारले की, हे नेते कुठे आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका करत, महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली. भाजपाने अजित पवारांना मंत्रिमंडळात घेतल्याबद्दलही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.