“राहुल सोलापूरकरांच्या विधानामागे कुणाचा सडका मेंदू?” रोहित पवारांचा सवाल
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाईच्या पेटाऱ्यांचा वापर न करता, लाच देऊन सुटका केली असा दावा केला आहे. यावरुन वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या विधानावर टीका करत, अशा वादग्रस्त विधानांमागील हेतू शोधण्याची गरज व्यक्त केली आहे.