संघाकडून पुन्हा एकदा औरंगजेब मुद्द्यावर भाष्य; भैय्याजी जोशींचं परखड मत, म्हणाले…
गेल्या महिन्याभरापासून औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेला वाद अद्याप शमला नाही. बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेकडून कबर हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी हा मुद्दा अनावश्यक असल्याचे सांगितले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कबरीवरची सजावट काढून तिथे औरंगजेबाच्या इतिहासाचा बोर्ड लावण्याची मागणी केली.