“आम्हाला टोलमाफीचं गाजर नको, त्यामुळे…”, सुमीत राघवनने व्यक्त केला संताप!
राज्य सरकारने मुंबईच्या पाच टोलनाक्यांवरील टोल लहान वाहनांसाठी माफ केल्याने दररोज ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, यामुळे टोलनाक्यांवर लांबच्या रांगा लागत आहेत. अभिनेता सुमीत राघवनने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना टॅग करून या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. टोलमाफीमुळे वाहतूक कोंडी वाढली असून, हलक्या वाहनांना प्रतिक्षा करावी लागत आहे.