Bigg Boss Marathi : लग्नाबद्दल विचारताच अरबाज पटेल लाजला अन् म्हणाला, “आता तर…”
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा नववा आठवडा सुरू झाला आहे, पण प्रेक्षकांमध्ये नाराजी आहे कारण हे पर्व १०० दिवसांचं नसून ७० दिवसांचं असणार आहे. गेल्या शनिवारी संग्राम चौगुले वैद्यकीय कारणास्तव बाहेर गेला आणि रविवारी अरबाज पटेल एलिमिनेट झाला. ‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यापासून अरबाज खूप चर्चेत आहे. नुकतंच त्यानं लग्नाबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.