श्रुती मराठेच्या मालिकेने अवघ्या तीन महिन्यात घेतला प्रेक्षकांचा निरोप, अचानक झाली बंद
मराठी मालिकाविश्वात सध्या अनेक मालिका अचानक बंद होत आहेत. 'सोनी मराठी'वरील 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' आणि 'भूमिकन्या' या दोन मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर यांची निर्मिती असलेल्या 'भूमिकन्या' ९३ भागांनंतर बंद झाली आहे. यासंदर्भात मालिकेतील अभिनेता मिलिंद अधिकारीने भावुक पोस्ट लिहिली आहे.