“कुलरच्या पाण्यात अंघोळ…”, आदिनाथ कोठारेने ‘पाणी’ चित्रपटाच्या शूटिंगचा सांगितला किस्सा
आदिनाथ कोठारे दिग्दर्शित आणि राष्ट्रीय पारितोषिक विजेता 'पाणी' चित्रपट आजपासून सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. मराठवाड्यातील पाणी टंचाईची समस्या आणि या समस्येला सामोरे जाणारे हनुमंत केंद्रे यांच्या संघर्षावर 'पाणी' चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा प्रियांका चोप्रा, डॉ. मधू चोप्रा, नेहा बडजात्या यांनी सांभाळली आहे. नुकताच आदिनाथ कोठारेने 'पाणी' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा किस्सा सांगितला.